Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विश्वासदर्शक ठराव मांडताच भाजपचा सभात्याग

मुंबईः विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावलेलं हे अधिवेशनच घटनाबाह्य आहे, असा आरोप करत भाजपने ठरावावर बहिष्कार टाकला आणि विधानसभेतून सभात्यग केला. हे अधिवेशन घटनाबाह्य आहे. त्याची संपूर्ण कारवाई रद्द करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत. राज्यपालांना यासंदर्भात पत्रद्वारे निवेदन देण्यात येणार आहे, असं भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावलेलं अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा शपथविधी, हंगमी अध्यक्ष बदलण्याची कारवाई आणि सुरू असलेलं कामकाज घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. यावरून भाजपच्या आमदारांनी दादागिरी नही चलेगी, अशी घोषणाबाजी केली. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हे अधिवेशन नियमानुसारच बोलावण्यात आलं आहे, हे सभागृहात स्पष्ट केलं. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका कायम ठेवली. घटनेची पायमल्ली करून हे अधिवेशन बोलावण्यात आलंय. नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी समन्स काढण्यात यायला हवं होतं. पण हे समन्स काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर नाही. तसंच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी घेतलेला शपथविधी हा अवैध आहे. शपथ घेताना मंत्र्यांनी आधी नेत्यांची नावं घेतली. त्यामुळे सर्व मंत्र्यांची शपथ अवैध आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी आणखी हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीचाही मुद्दा मांडला. राज्यपालांनी हंगामी विधानसभा अध्यक्षाची नियुक्ती केली होती. पण नंतर नियमबाह्य प्रकारे हंगामी अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे हंगामी अध्यक्ष हटवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यानं ते हंगामी अध्यक्षांमार्फत विश्वासदर्शक ठराव घेत आहेत, असा आरोप करत विधानसभेचं हे संपूर्ण कामकाजच घटनाबाह्य आहे, असं फडणवीस म्हणाले. आम्ही या कामकाजावर बहिष्कार टाकतो, असं सांगत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत भाजप आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला. हंगामी अध्यक्षांनी फडणवीसांचे आरोप खोडून काढले दरम्यान, भाजपच्या सभात्यागापूर्वी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. विधानसभेचं हे अधिवेशन राज्यपालांच्या आदेशानंतरच घेण्यात आलं आहे. तसंच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. आणि मंत्र्यांचा शपथविधी हा शिवाजी पार्कवर झाल्यानं हा मुद्दा विधासभागृहाच्या आखत्यारित येत नाही. त्यामुळे आपण यावर भाष्य करणार आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2P2T9oW
via IFTTT