Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुंडा पार्टीच्या सत्तेत भय्ये सुरक्षित असतील का?: विवेक अग्निहोत्री

मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन भिन्न विचारधारांचं सरकार स्थापन झालं आहे. यापैकी ज्या पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे त्या शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून मराठी अस्मितेभोवती फिरत राहिली आहे. त्यामुळे मुंबईतल्या अमराठींचं काय होणार असा प्रश्न काही लोकांना पडला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा पती लेखक, दिग्दर्शक यापैकीच एक. 'गुंडा पार्टी सत्तेत आल्यावर माझ्यासारखे भय्ये सुरक्षित असतील का?', असा खोचक सवाल त्याने केला आहे. विवेक रंजन अग्निहोत्री याने ट्विटद्वारे हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तो लिहीतो, 'मला वाटतं की आता शहरातल्या नावांच्या पाट्या बदलणं वगैरेसारखे प्रकार सुरू होतील. हे सरकार मराठा अस्मितेला फुंकर घालणारे काही मूर्खपणाचे निर्णय घेईल. या गुंडा पार्टीच्या राज्यात माझ्यासारखे भैय्ये सुरक्षित राहतील का?' शिवसेनेनंतर दुसऱ्याच दिवशी विवेकने काँग्रेसवरही तोफ डागली होती. नेटकऱ्यांनी विवेकच्या या ट्विटला खरमरीत उत्तरंही दिली आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियाद्वारे नेहमीच व्यक्त होत असतो. त्याचा ताश्कंद फाइल्स हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XUro6c
via IFTTT