Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भुजबळ, देसाई, पाटील, शिंदेही घेणार उद्या मंत्रिपदाची शपथ

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत उद्या शिवतीर्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेना नेते आणि एकनाथ शिंदेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मॅरेथॉन बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येक दोन मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष वाढीची धुरा राहणार असल्याने त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाही उद्या शपथविधी सोहळा होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजित पवार माघारी पतल्यानंतर त्यांचं राष्ट्रवादीतील मानाचं स्थान कायम असल्याचं बोललं जात होतं. झालेल्या साऱ्या गोष्टी विसरून अजितदादांना उपमुख्यमंत्री करावं, असा आग्रहही पक्षातील अजितदादांच्या समर्थकांनी धरला होता. मात्र, हा आग्रह पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मान्य नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्याऐवजी सध्याचे राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील हेच उपमुख्यमंत्री होतील, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद राज्यातील सत्तेचा ताळमेळ राखण्यासाठी तिन्ही पक्षांनी सुनियोजित आखणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात केवळ एकच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडीच्या बैठकीतील निर्णयानुसार राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असून काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्यात येणार आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार आहे. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्ष असतील. ३ डिसेंबरच्या आत विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नवे मुख्यमंत्री पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.