Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या वेगळी आघाडी झाली. महाविकास आघाडीसाठी अनेकांनी कष्ट घेतले. कोणालाही अडचण येऊ नये यासाठी 'समान विकास कार्यक्रम' तयार करण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्य जनेतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे ही महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास कर्जत जामखेडचे आमदार यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करताना आपल्याला सभागृहात आणि बाहेर वरिष्ठ सदस्यांकडून खूप शिकायला मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामांची पद्धतीची माहिती झाली. जिल्हा परिषदेतील सदस्यांचे, प्रशासनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. विधीमंडळात जिल्हा परिषदेच्या समस्या निश्चित मांडू, असाही विश्वास रोहित पवार यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विद्यमान आमदार रोहित पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेत करण्यात आला. 'सत्काराच्या माध्यमातून मला 'मिनी विधानसभा' जवळून पाहता आली. राज्यातील नव्या आघाडीमुळे जिल्हा परिषदेतील सर्वांची ताकद वाढली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. या बरोबर सभागृहातील काहीवर त्यांच्या पक्षांनी कारवाई केली आहे. त्यांना आमच्या पक्षाची दारे खुली आहेत. त्यांनी विचार करावा,' अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि आशा बुचके यांचे नाव न घेता त्यांना यावेळी आमदार जगताप यांनी ऑफर दिली.