Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबई: ४०० नाराज शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश


मुंबई: धारावीमधील सुमारे ४०० शिवसैनिक शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये दाखल झाले. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार बनवल्याने खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेने भ्रष्ट आणि प्रतिस्पर्धी पक्षांशी हातमिळवणी करणे गैर असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेने भ्रष्ट आणि हिंदू विरोधी असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेतल्यासारखे आपल्याला वाटत असल्याचे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले रमेश नाडार यांनी सांगितले. शिवसेनेतील एकूण ४०० कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केल्याची माहतीही नाडार यांनी दिली. केवळ सत्तेत यावे म्हणून शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी झाल्याचा आरोपही भाजपत प्रवेश केलेल्या शिवसैनिकांनी केला. 'लोकांच्या नजरेला नजर कशी द्यावी?' शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी झाल्यामुळे नाराज झालेले असंख्य शिवसैनिक शिवसेनेत असल्याचेही नाडार यांचे म्हणणे आहे. आपण गेल्या ७ वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या विरोधात लढत असल्याचे नाडार म्हणाले. निवडणुकीदरम्यान त्यांनी घराघरात जात लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता त्या लोकांच्या नजरेला नजर आपण कशी देऊ शकतो, असे नाडार यांचे म्हणणे आहे. राज्यात प्रामाणिक सरकार स्थापन व्हावे यासाठी आपण लोकांकडे मते मागितली होती, या कडेही नाडार यांनी लक्ष वेधले आहे.