भाजपने विकासाच्या नावावर वैदर्भीय जनतेचा अवमान केला आणि पाच वर्षांत विदर्भाचा विकास खुंटला', असा घणाघाती आरोप नूतन मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला. राज्यातील एकंदरीत आर्थिक स्थिती, ४ लाख ७१ हजार कोटी रुपये कर्जाचा डोंगर यातून बाहेर कसे निघावे, याबाबत श्वेतपत्रिका जारी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. राऊत यांचे सोमवारी दुपारी पहिल्यांदाच नगरागमन झाले. दीक्षाभूमी येथे दर्शन घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारच्या कारकिर्दीवर टीका करून विदर्भाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा केला.
भाजपने पाच वर्षे काहीच केले नाही. विकासाच्या नावावर खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. ना विकास केला, ना वेगळे राज्य. ना उद्योग आले, ना रोजगार मिळाला. भाजप नेत्यांनी थापा मारण्याचे काम केल्याने विदर्भाचा विकास थांबला. विदर्भाच्या विकासासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि शेतकरी व तरुणांना मानाचे स्थान मिळवून देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारवर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.
शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी भाजपने केली असल्याकडे लक्ष वेधले असता, 'राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत रविवारी आढावा घेण्यात आला. राज्यावर ४ लाख ७१ हजार कोटी कर्जाखेरीज २ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. फडणवीस सरकारने कर्जाचा डोंगर उभारण्याचे काम केले. २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यास आमची ना नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर-विदर्भातील प्रगतिपथावरील प्रकल्पांच्या भवितव्याबाबत विचारले असता, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भ विकासाचे वचन दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे वचन पूर्ण करण्यात येईल. विदर्भातील प्रकल्पांना चालना देणे, रोजगारनिर्मितीवर भर देण्याचे प्रयत्न राहतील', असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व पाळण्यात येईल. काँग्रेस जातीचे राजकारण करत नाही, असा संदेश महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्य व देशात पक्षाने दिला. काँग्रेसने माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला पहिल्याच शपथविधीत मंत्रिपदाची संधी दिली आणि शेतकरी व ओबीसींसाठी सातत्याने आवाज बुलंद करणारे नाना पटोले यांना विधानसभाध्यक्षपदी संधी दिली. यातून पक्षाने जनतेला सकारात्मक संदेश दिले आहेत, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.
दाल मे काला...
बुलेट ट्रेनबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, त्यांच्याच पक्षाच्या एका जबाबदार खासदारांनी आरोप करण्यामागे नक्कीच 'दाल मे काला हैं' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ८० तासांचे औटघटकेचे मुख्यमंत्री ठरलेले फडणवीस यांनी तर काही काळेबेरे केले नाही ना, अशी शंका नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
सकाळ पेपर औरंगाबाद
सकाळ पेपर पुणे
सकाळ पेपर कोल्हापूर
सकाळ पेपर सांगली
sakal
सकाळ नाशिक ग्रामीण
sakal epaper sangli
सकाळ पेपर नाशिक जिल्हा
