Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतीय डाक विभागा थोडी महीती



राज्यात भरणार ३ हजार रिक्त पदे; ग्रामीण सेवेवर विशेष भर

गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या टपाल विभागातील पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला असून राज्यात तब्बल ३ हजार ६५० पदे भरण्यात येणार आहेत. ‌विशेष म्हणजे, ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे टपाल सेवा अधिक प्रबळ होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील सेवेला सर्वाधिक ‘बूस्ट’ मिळणार आहे. ३१ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार पात्र असणार आहेत.

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये ३ हजार ६५० रिक्त जागा भरणार असल्याची टपाल विभागाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार ब्रांच पोस्ट मास्तर, सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्तर, डाक सेवकांची पदे भरण्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ही पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत टपाल सेवकांवर कामाचा वाढता ताण येत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात आणि यावर्षी ऑक्टोबरमध्ये टपाल सेवकांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात आंदोलन पुकारले. तेव्हा लवकरच पदे भरणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. विधानसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या भरतीप्रक्रियेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या भरती अंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुमारे ११२ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे टपाल सेवा अधिक जलदरित्या होण्यास मदत होणार असून कार्यरत सेवकांचा ताण हलका होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन बँकिंग, टपाल सेवेचे बदलते स्वरूप, ग्राहकांची वाढती संख्या यामुळे टपाल कर्मचाऱ्यांची सारखी उणीव भासत होती. अनेक ठिकाणी कर्मचारी नसल्याने कामाचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या समस्या टाळण्यासाठी आणि खास म्हणजे, ग्रामीण भागात योग्यरित्या तत्पर सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांची भरती केली जात असल्याचे टपाल विभागातर्फे सांगण्यात आले.

How To Apply For Indian Posts / असा करा अर्ज

टपाल विभागाच्या भरती संदर्भात सर्व माहिती https://maharashtrapost.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. इच्छुकांना अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाइटवर नोंदविता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना लॉगिन तयार करावे लागेल. १८ ते ४० वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असतील. तर, नियुक्त होणाऱ्यांना प्रतिमहिना १०,००० ते १४,५०० रुपये वेतन असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये असून एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नसेल.