व्यवस्थित ऐकायला यावे यासाठी डॅाक्टर कानाला मशीन लावण्याचा सल्ला देतात. मात्र, अनेकदा त्यात चालढकल होते. कानाचे मशीन नेमके कधी लावायचे असते?
डॅाक्टरांचा सल्ला लगेच ऐकाः कानात संसर्ग झाल्याने, पाण्यासदृश पांढरा चिकट द्रव वाहू लागतो, त्यात पू होतो, अनेकदा प्रतिजैविकांच्या मारा केल्याने श्रवणशक्ती कमी होते. ही सगळी लक्षणं हळुहळू दिसू लागतात. त्यांचा थेट परिणाम जाणवत नसल्याने आधीच डॅाक्टरकडे जायला रुग्ण उशीर करतात. डॅाक्टरांनी कानाला मशीन लावण्याचा सल्ला दिल्यावर तो पाळला जात नाही. मात्र, ही चालढकल केल्यास कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो. त्याचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. हे मशीन मुख्यतः बहिरेपणावर मात करण्यासाठी लावले जाते. कमी ऐकू येण्याचे निदान झाल्यावर तीन महिन्याच्या बाळापासून कुणालाही हे मशीन बसवता येते. मूल मोठे झाले तरी मशीनच्या आतील स्वरयंत्र तसेच राहते. त्याचा मोल्ड केवळ बदलावा लागतो.
यापूर्वी खूप मोठ्या आकाराची श्रवणयंत्रे असत. आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे. अत्यंत छोटी, साधी व मोबाईलच्या हेडफोनच्या आकाराची दिसूही न शकणारी यंत्रे आता आहेत. त्यांचा योग्यवेळी वापर केल्यास बहिरेपणावर मात करता येते. बहिरेपणाचे निदान झाल्यानंतर डॅाक्टरांच्य सल्ल्याने मशीन त्वरित लावून घ्यावे.
यापूर्वी खूप मोठ्या आकाराची श्रवणयंत्रे असत. आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे. अत्यंत छोटी, साधी व मोबाईलच्या हेडफोनच्या आकाराची दिसूही न शकणारी यंत्रे आता आहेत. त्यांचा योग्यवेळी वापर केल्यास बहिरेपणावर मात करता येते. बहिरेपणाचे निदान झाल्यानंतर डॅाक्टरांच्य सल्ल्याने मशीन त्वरित लावून घ्यावे.
या मशीनचा मोल्ड शारिरिक वाढीनुसार बदलावा लागतो. त्यासाठी प्रत्येक वर्षी कानाची तपासणी करताना त्याबद्दलही डॅाक्टरांकडे विचारणा करावी
बाहेरील स्वर व यंत्र याचा मेळ योग्य पद्धतीने बसतो आहे का, याची खातरजमा करावी.
या मशीनच्या किमती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. भावात समानता नसते. त्यामुळे खूप किंमत मोजलेले मशीनच उत्तम, असे समजू नये.
ही मशिन्स परदेशी बनावटीची असल्याने त्याच्या किमत खासगी संस्था वा विक्रेत्यांकडे अधिक असतात. त्यातील किमतीतही तफावत असते. कारण या मशिन्सची आयात, त्यावरील कर यांचा भार पेशंटच्या खिशावर पडतो. अनेकदा स्वस्त म्हणून घेतलेले मशीन कालांतराने खराब होते. त्यामुळे या मशीनची गुणवत्ता डॅाक्टरांशी चर्चा करून, तपासून घ्यावी.
जितक्या लवकर बहिरेपणावर मात करण्यासाठी उपचारांची सुरुवात होते, तितक्या लवकर रुग्णांचे पुनर्वसन करणे शक्य असते, हे कायम लक्षात ठेवावे.
जितक्या लवकर बहिरेपणावर मात करण्यासाठी उपचारांची सुरुवात होते, तितक्या लवकर रुग्णांचे पुनर्वसन करणे शक्य असते, हे कायम लक्षात ठेवावे.