Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार

औरंगाबाद: विधानसभा निवडणूकीत फसवणूक करीत मतदान करून घेतल्याचा आरोप करीत शिवसेना पक्षप्रमुख , माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि औरंगाबाद मध्यचे शिवसेनेचे आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात एका नागरीकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रत्नाकर भिमराव चौरे (वय ३४ रा. बेगमपुरा) असे या तक्रारदाराचे नाव आहे. या तक्रारीत चौरे यांनी ठाकरे, खैरे आणि जैस्वाल विधानसभा निवडणूकीचा १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरच्या दरम्यान प्रचार करताना हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी, हिरव्याला गाडण्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मी व माझ्या कुटुंबीयानी या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदिप जैस्वाल यांना मतदान करून निवडून दिले असून भाजपा समर्थकांच्या पडलेल्या मतामुळे जैस्वाल निवडून आल्याचा दावा केला आहे. निकालानंतर शिवसेनेने भाजप पक्षाशी असलेली युती तोडत सरकार स्थापन केले नाही, त्यामुळे त्यांना भाजप समर्थक म्हणून केलेले मतदान वाया गेल्यासारखे वाटत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ठाकरे, खैरे यांनी आणि जैस्वाल यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली फसवणूक करून मतदान घेतले असून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. या तक्रारीची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या विरुद्ध रत्नाकर चौरे यांचा तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात आला आहे. हा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.