मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत आज शनिवारी मांडण्यात आलेल्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने विनासायास बहुमत सिद्ध केले. २८८ आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा सरकारला हवा होता, तो या नव्या सरकारने मिळवला आणि १६९ मतांनी ठराव जिंकला. विरोधी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला होता, मात्र सभागृहात उपस्थित असलेल्या ज्या चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहणे पसंत केले त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव आमदाराचाही समावेश होता! यांचे बंधू आणि अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात मतदान केले नाही, मात्र सरकारच्या बाजुनेही मतदान केले नाही. यापूर्वी गुरुवारी उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्यास यांनी आवर्जून हजेरी लावली होती, त्यामुळे राज यांचा आमदार कुणाच्या बाजुने मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत्या तिकीटावर कल्याण येथून राजू रतन पाटील हे जिंकून आले आहेत. विश्वासदर्शक ठरावावेळी पाटील हे पक्षादेशानुसार तटस्थ राहिले. मनसेसह एमआयएमचे दोन आणि माकपचा एक अशा एकूण चार आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी बहुमत चाचणीसाठी विधिमंडळाचे विशेष सत्र घेण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच दावा केला होता की त्यांना अनेक लहान पक्षांचं समर्थन आहे. त्यामुळे ते सहज जिंकतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या या सरकारला प्रहार (२), बहुजन विकास आघाडी (०३), समाजवादी पक्ष (०२), स्वाभिमानी शेतकरी पक्ष (०१), शेतकरी कामगार पक्ष (०१) क्रांतीकारी शेतकरी पक्ष (०१) आणि अपक्ष (०५) या मित्रपक्षांनी तसेच अपक्षांनी पाठिंबा दिला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35Yd4fV
via IFTTT