Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा: जयंत पाटील

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहात पाय ठेवत आहेत, अशा वेळी माजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडायला हवा होता, त्याऐवजी त्यांनी नको ते मुद्दे काढत सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं, असं निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते यांनी आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नोंदवलं. 'विरोधी पक्षाचा नेता दर्जेदार असावा. चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेते हवेत की देवेंद्र फडणवीस अशी भाजपमध्ये चर्चा होती. तेव्हा त्यांची स्पर्धा होऊ द्या आणि नंतर त्यांना एकमताने विरोधी पक्षनेता ठरवू द्या,' अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे व्यक्त केली. 'छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज फुले यांचं नाव शपथविधीच्या वेळी घेतलं तर भाजपच्या नेत्यांना का त्रास झाला. सरकारस्थापनेची सर्व प्रक्रिया आपण गेले काही दिवस पाहात आहात. माझ्यासह सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली, ती जो मजकूर आमच्या हातात होतं तोच मजकूर आम्ही वाचला. एखादं चागलं काही आयुष्यात घडत असताना आपलं जे दैवत आहे त्याचा उल्लेख केला आणि खास करून छत्रपतींचा उल्लेख झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांना का राग आला? या महापुरुषांविषयी यांच्या मनात पिढ्यानपिढ्या असूया आहे,' असं जयंत पाटील म्हणाले घोडेबाजाराला वाव दिला नाही याबद्दल पाटील यांनी हंगामी अध्यक्षांचे अभिनंदन केले. अशाप्रकारे पुढील पाच वर्षंदेखील कोणताही घोडेबाजार होणार नाही, हे पाहायला हवं असंही ते म्हणाले. 'टेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. रोज प्रोटेम स्पीकर बदलण्याचा अधिकारही मंत्रिमंडळाला आहे,' असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34BS5yS
via IFTTT