मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांची भूमिका सध्या संभ्रमात टाकणारी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतः चर्चा केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रेनिसन्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केली. याचवेळी मौन बाळगून असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासोबतही पवार-ठाकरेंनी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर धनंजय मुंडे दिवसभर संपर्कात नव्हते. अखेर सायंकाळी त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावली. पण आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलेलं नाही. हीच संशयास्पद भूमिका पाहता पवारांनी धनंजय मुंडेंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही अजित पवारांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती. अजित पवारांच्या पुढाकारानेच ते राष्ट्रवादीत आले होते. अजित पवारांच्या बंडाची इनसाईड स्टोरी ‘मुंबई मिरर’ने अजित पवारांच्या बंडाबाबत काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. १७ नोव्हेंबरला पुण्यात राष्ट्रवादीची बैठक झाली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या त्याच बैठकीत अजित पवारांनी त्यांचे भविष्यातील संकेत दिले होते. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्यापेक्षा भाजपला पाठिंबा द्यावा, असं मत अजित पवारांनी मांडलं आणि सर्वांना धक्का दिला. अजित पवारांचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. कारण, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील चर्चा पुढच्या टप्प्यावर गेली होती. यानंतर दिल्ली आणि मुंबईत विविध बैठका झाल्या. धनंजय मुंडे आणि तटकरेंकडूनही भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी पुतण्याने ठेवलेला प्रस्ताव फेटाळला असला तरी ते संभाव्य धोका लक्षात घेण्याचं विसरले. यानंतर एकाच आठवड्यात अजित पवार यांनी बंड करुन राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात फूट पाडली. प्रश्न फक्त अजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाचाच नाही. मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या विविध बैठकीतही धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असं ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका ? संपूर्ण घटनाक्रमात आरएसएसची भूमिकाही नाकारली जाऊ शकत नाही. अजित पवारांचे आईकडील बंधू जगदीश कदम हे आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांना पवार कुटुंबात कलह वाढवण्याची जबाबदारी दिली असल्याचं बोललं जातं. कदम हे डेक्कन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. या संस्थेकडून राज्यातील अनेक नामांकित महाविद्यालये आणि संस्था चालवल्या जातात आणि डेक्कन संस्थेचं नियंत्रण आरएसएसकडे आहे. या वृत्तानुसार, कदम यांनीच अजित पवारांना विश्वासात घेतलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तर दुसरीकडे पुतणे रोहित पवार यांचं नेतृत्त्व वेगाने तयार होतंय. सुप्रिया सुळेंसोबतही अजित पवारांचे मतभेद वेळोवेळी होत राहिल्याचं बोललं जातं. ही सर्व कारणं अजित पवारांना स्वतंत्र मार्ग निवडण्यास भाग पाडत होती. विश्वासू आमदारांशी चर्चा अजित पवारांनी सोमवारपासूनच विश्वासू आमदारांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्यांना एकच प्रश्न विचारला. ‘मी काही मोठं पाऊल उचललं तर तुम्हाला त्यात गृहित धरू शकतो का?’ असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. मात्र हे मोठं पाऊल काय असेल याचा खुलासा अजित दादांनी कधीही केला नाही. याच काळात शिवसेना आणि काँग्रेससोबत होत असलेल्या बैठकांमध्येही अजित पवार सहभागी होत राहिले. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार मुंबई आणि दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या किमान ५ बैठकांना उपस्थित होते. एका काँग्रेस नेत्याच्या मते, अजित पवारांनी शुक्रवारी नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेली बैठक अर्ध्यातच सोडली होती. ‘मुंबई मिरर’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठक जवळपास दोन तास चालली. पण अजित पवार ५५ मिनिटांनी निघून गेले.’ याच बैठकीतून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी घोषणा केली होती की, 'पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल'. यानंतर अजित पवारांनी विश्वासू आमदारांना फोन केला. आता अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर तडजोड होत असून आपण अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असं सांगितलं. तिथून पुढेच महाराष्ट्रात खळबळ उडवणारी शपथविधीची बातमी समोर आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2rlgbPM
via IFTTT