Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यात स्थिर सरकार देऊ; अजित पवारांकडून मोदींचं आभार

मुंबई: उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान यांचे आभार मानले आहेत. आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. भाजपने मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे अजित पवार हे त्यांच्या बंडावर कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पवार यांनी आज अवघ्या दहा मिनिटात २४ ट्विट करून पंतप्रधानांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं आभार मानले आहेत. 'आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ. जनतेच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम घेऊ. शुभेच्छांबद्दल धन्यवाद,' असं ट्विट करत अजित पवार यांनी मोदींचे अभार मानले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप नेते नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, जे. पी. नड्डा, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नकवी, गजेंद्रसिंह शेखावत, सुरेश प्रभू, गिरीश बापट, मुख्यमंत्री विजय रुपानी, मनसुख मांडवीया, रामदास आठवले, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, बी. एल. संतोष, रवी किशन, अमृता फडणवीस आदींना टॅग करून त्यांचेही पवार यांनी आभार मानले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कालपासून अजित पवार यांची मनधरणी सुरू केली होती. आजही या नेत्यांनी अजित पवार यांची मनधरणी केली. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. हे नेते अजित पवारांना भेटून गेल्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक ट्विट करत भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे अजित पवार हे आपल्या बंडावर कायम असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्यानंतरही अजित पवार यांनी राष्ट्रवादीत न परतण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे येत्या ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी पवार किती आमदार स्वत:कडे खेचून आणण्यात यशस्वी ठरतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OcII2W
via IFTTT