Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शपथविधीला शाहांनाही बोलावणार: राऊत

मुंबई : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड निर्माण करणाऱ्या ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. या शपथविधीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांनाही निमंत्रण देणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिलं जाईल का?’ या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘होय, आम्ही सर्वांना बोलावणार आहोत. अमित शाहांनाही निमंत्रण दिलं जाईल.’ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. शिवाय शपथविधीचं ठिकाण आणि वेळही तातडीने जाहीर करण्यात आली. ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. याचवेळी उद्धव ठाकरे यांचं नावही मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही सर्वांनी दिलेली जबाबदारी मी स्वीकारतो. आपण सर्व जण मिळून सोबत काम करू. आज जे घडलं ती खऱ्या अर्थाने लोकशाही होती. आता राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातीन अश्रू पुसण्याचं काम करायचं आहे.’ दरम्यान, आपण कधीही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही आभार मानले.

आज आम्ही तीन दिशेला असणारे पक्ष एकत्र आलो आहोत. एकमेकांवर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार आहोत, असं सांगतानाच ज्यांच्याशी ३० वर्ष मैत्री केली. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी ३० वर्ष सामना केला. त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आयुष्यात काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. हे शिवधनुष्य आहे आणि तुमच्या साथीने हे शिवधनुष्य पेलायचे आहे, असंही ते त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष आभार मानले. तसेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचले त्या शिवसैनिकांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33kJOht
via IFTTT