Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किमान समान कार्यक्रम; पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय?

मुंबई : शपथविधी सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीने जाहीर केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत तपशील जाहीर केला. तरुणांना रोजगार, राज्याचा आर्थिक विकास आणि शेतकरी प्रश्न या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आखलेल्या किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीची नियुक्तीही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मुंबईकरांना लवकरात लवकर मेट्रो सेवा देण्याचा प्रयत्न असेल, आरेमध्ये रातोरात झाडं कापली, त्याच्या विरोधात सर्व पक्ष आहेत, अशीही भूमिका जयंत पाटील यांनी जाहीर केली. त्यामुळे वृक्षतोडल्याप्रकरणी काही कारवाई होणार का याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात १० रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होती. त्याचाही समावेश किमान समान कार्यक्रमात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात स्वस्तात जेवण शक्य होण्याची आशा आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय? पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार ही शिवसेनेची कायमच भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना पुन्हा एकदा मराठी बाणा दाखवणार आहे. कारण, स्थानिक भूमीपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्तेत येताच स्थानिक भूमीपुत्रांना आरक्षणाचा कायदा केला होता. शपथविधीची जय्यत तयारी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज शपथविधी होत आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात होत असलेल्या या सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवतीर्थावर या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. शपथविधीसाठी शिवतीर्थावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ साकारण्यात आलं आहे. संपूर्ण व्यासपीठाला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित आणि अश्वारुढ प्रतिमा व्यासपीठाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे. तसंच, स्वराज्याची 'शिवमुद्रा' व्यासपीठावर कोरण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37KS1z6
via IFTTT