Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवारांना बळ, वायबी चव्हाण सेंटरबाहेर तुफान गर्दी


मुंबई : दिवसभराच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘पवार साहेब तुम आगे बढो’च्या घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि त्या शरद पवारांसह रवाना झाल्या. वायबी सेंटरबाहेर सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली होती. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं ? ‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीला ५४ पैकी पाच ते सहा आमदार उपस्थित नव्हते. सर्व आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सर्वाधिकार दिले आहेत. अजित पवार यांच्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. आता विधानसभा अध्यक्षाच्या निवडीत भाजपला हरवण्याचं ध्येय आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादीचे आमदारही हॉटेलमध्ये राहणार राष्ट्रवादीने अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'राष्ट्रवादीच्या बैठकीला ४२ आमदार उपस्थित होते, तर काही आमदार त्यांच्या मतदारसंघात असून संपर्क झाला आहे. सर्व आमदारांना मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्व आमदारांना बसमधून हॉटेलकडे नेण्यात आलं.' राष्ट्रवादीने आतापर्यंत आमदारांना सुरक्षित स्थळी नेलं नव्हतं. पण पहिल्यांदाच राष्ट्रवादीही सतर्क झाली आहे. सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असे नमूद करतानाच या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे. यावर रविवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे.

https://www.ilovebeed.in/