Amit.Ruke @timesgroup.com Tweet : AmitRukeMT : शिवसेनेच्या जाहिरनाम्यातील घोषणेनुसार दहा रुपयांत जेवणाची थाळी मिळणार का, याबाबत राज्यात प्रचंड उत्सुकता असतानाच पुण्यातील एका शिवसैनिकाने हा उपक्रम यशस्वी 'करून दाखविला' आहे. रास्ता पेठेत सुमारे वर्षभर हा उपक्रम 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर सुरू असून मनुष्यबळाचा खर्च वाचला, तर देणे आर्थिकदृष्ट्याही शक्य असल्याचा या शिवसैनिकाचा अनुभव आहे. निवडणुकीमध्ये आपल्या वचननाम्यात शिवसेनेने केलेल्या दहा रुपयात थाळीच्या घोषणेची मोठी चर्चा झाली. त्यानंतर रंगलेल्या सत्तानाट्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. या सगळ्यात शिवसेनेला दहा रुपयात थाळीच्या आपल्या आश्वासनाची आठवण अनेक 'नेटिझन्स' करून देत असताना, पुण्यातील रास्ता पेठेत गेल्या अकरा महिन्यांपासून दहा रुपयांत थाळी उपलब्ध करून देणारे सध्या चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे माजी विभागप्रमुख दत्ता जाधव यांनी जानेवारी महिन्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी या उपक्रमाची सुरवात केली होती.
त्यानंतर योगायोगाने पक्षाने आपल्या वचननाम्यात या उपक्रमाचा समावेश केल्यावर त्यांना अधिकच उत्साह आला. आता परिसरातील पाच ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्याचा त्यांचा व शिवसैनिकांचा मानस आहे. दहा रुपयात भाजी, दोन चपात्या, भात व लोणचे अशा पदार्थांचा समावेश थाळीत होतो. या उपक्रमाची सुरुवात दत्ता जाधव, सागर गायकवाड, सुमित जाधव, सोहम जाधव, शेखर गायकवाड या शिवसैनिकांनी केली. उपक्रमासाठी कोणतीही देणगी घेतली जात नाही. जेवण तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंत लागणारी सर्व कामे शिवसैनिक मिळून करतात. त्यामुळे मनुष्यबळावर होणारा खर्च वाचतो. त्यातूनच दहा रुपयांत कोणताही मोठा तोटा ना होता थाळी देणे शक्य झाले आहे, असे जाधव यांनी सांगितले. रोज ३५० ते ४५० नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात. अधिक संख्येत थाळ्या हव्या असतील, तर पार्सलदेखील दिले जाते. परिसरातील अनेक नोकरदार या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. काही कुटुंबेदेखील डब्यातून अनेकदा जेवण घेऊन जातात. दत्ता जाधव हॉटेल व्यवसायिक असल्याने उपक्रमात त्यांना व्यवसायाची मदत होते. सध्या शहरातील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी त्यांच्याकडे या उपक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी येत असून, सरकारने सुरू करण्याचा आधीच काही प्रमाणात का होईना शिवसैनिकच आपल्या पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण करतील, अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली आहे.
त्यानंतर योगायोगाने पक्षाने आपल्या वचननाम्यात या उपक्रमाचा समावेश केल्यावर त्यांना अधिकच उत्साह आला. आता परिसरातील पाच ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्याचा त्यांचा व शिवसैनिकांचा मानस आहे. दहा रुपयात भाजी, दोन चपात्या, भात व लोणचे अशा पदार्थांचा समावेश थाळीत होतो. या उपक्रमाची सुरुवात दत्ता जाधव, सागर गायकवाड, सुमित जाधव, सोहम जाधव, शेखर गायकवाड या शिवसैनिकांनी केली. उपक्रमासाठी कोणतीही देणगी घेतली जात नाही. जेवण तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंत लागणारी सर्व कामे शिवसैनिक मिळून करतात. त्यामुळे मनुष्यबळावर होणारा खर्च वाचतो. त्यातूनच दहा रुपयांत कोणताही मोठा तोटा ना होता थाळी देणे शक्य झाले आहे, असे जाधव यांनी सांगितले. रोज ३५० ते ४५० नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात. अधिक संख्येत थाळ्या हव्या असतील, तर पार्सलदेखील दिले जाते. परिसरातील अनेक नोकरदार या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. काही कुटुंबेदेखील डब्यातून अनेकदा जेवण घेऊन जातात. दत्ता जाधव हॉटेल व्यवसायिक असल्याने उपक्रमात त्यांना व्यवसायाची मदत होते. सध्या शहरातील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी त्यांच्याकडे या उपक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी येत असून, सरकारने सुरू करण्याचा आधीच काही प्रमाणात का होईना शिवसैनिकच आपल्या पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण करतील, अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली आहे.