Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मी म्हणजेच महाराष्ट्र... हा दर्प फडणवीसांना नडला: शरद पवार


मुंबई: 'मी म्हणजेच महाराष्ट्र... मी म्हणेल तो महाराष्ट्र... माझ्या आसपास कुणीच नाही... हा 'मी' पणाचा दर्प जो यांनी दाखवला, तो लोकांना सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी फडणवीस यांच्या सध्याच्या पीछेहाटीचं विश्लेषण केलं आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी दीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीवरही भाष्य केलं. 'मी पुन्हा येईन...' या घोषणेत मला काही वावगं वाटत नाही.
हेही वाचा : अरोग्य विषयी
तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही त्याचा उपयोग संघटनेसाठी करून घेणं अजिबात चुकीचं नाही. मात्र, त्यात दर्प असता कामा नये. फडणवीस यांच्या अलीकडच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता. 'शरद पवार हे इतिहासजमा झालेलं नाव आहे. आता मीच आहे. मी म्हणजे सगळं. बाकी सगळे तुच्छ अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोकांना हे आवडत नाही. लोकांना 'मी'पणा आवडत नाही. विनम्रता आवडते,' असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री होण्याआधी ते कुठे होते? मुख्यमंत्री होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचं काही वेगळं स्थान नव्हतं. ते नागपूरचे महापौर होते. तेथील महापालिकेत त्यांचं योगदान असेल. विधानसभेत सक्रिय सभासद म्हणून त्यांचा नावलौकिक होता. या निश्चितच जमेच्या बाजू आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यावर 'मी म्हणजेच महाराष्ट्र... माझ्या आसपास कुणीच नाही...' अशी त्यांची भूमिका होती. तो दर्प त्यांना नडला. आज भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यात मोदींचं मोठं योगदान आहे. त्यांच्याकडं पाहून लोकांनी मतं दिलीत, हे विसरता कामा नये,' असंही पवार म्हणाले.