Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झालं आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या सहा मंत्र्यांचा शपथविधीही झाला. या मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला उद्धव ठाकरेंकडे आला आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील 'सागर' बंगला देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी असणारा 'वर्षा' बंगला उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना 'रामटेक' हा त्यांचा ते मंत्री असतानाचाच बंगला पुन्हा मिळाला आहे. जयंत पाटील यांना 'सेवासदन' बंगला देण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे यांना 'रॉयलस्टोन' बंगला देण्यात आला आहे. मंत्रीपदावर असेपर्यंत मंत्र्यांना या शासकीय बंगल्यांमध्ये निवास करता येतो. पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणं बंधनकारक असतं. महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहेत. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांचा समावेश आहे. यातील शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेत थोरात आणि नितीन राऊत या तीन मंत्र्यांना अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी जाणार की 'मातोश्री' या त्यांच्याच निवासस्थानी राहणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी जे जे करावं लागणार ते मी करणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यामुळे ते वर्षा या निवासस्थानी कधी जातात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34IHHpo
via IFTTT