मुंबई: भाजपच्या नेत्या व माजी मंत्री यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळं भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. 'पंकजांच्या पक्षांतराच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. त्या भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील,' असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे नाराज आहेत. पक्षातीलच काही लोकांनी आपल्याविरोधात काम केल्याची त्यांची भावना झाल्याचं बोललं जातं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळं यात भर पडली. त्यातच आज त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेख काढल्यानं संभ्रम निर्माण झाला. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्येही यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं. या साऱ्याची दखल घेऊन पाटील यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली व खुलासा केला. 'पंकजा मुंडे वेगळा विचार करताहेत ही केवळ अफवा आहेत. आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान आहे. पंकजा या त्यांच्याच तालमीत घडल्या आहेत. त्या भाजपमध्ये आहेत आणि राहतील, असं पाटील म्हणाले. '१२ डिसेंबर ही गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,' असं ते म्हणाले. पंकजा यांच्या मामेबहीण व खासदार पूनम महाजन यांनीही या वृत्ताचं खंडन केलं आहे. 'पंकजा पराभवामुळं व्यथित आहेत. पण त्या पक्ष सोडणार नाहीत. मी स्वत: पराभव पाहिला आहे. त्यामुळं मी त्यांची स्थिती समजू शकते,' असंही महाजन म्हणाल्या. राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपमध्ये स्थानिक नेतृत्वाबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता पंकजांच्या पक्षबदलाची चर्चा सुरू झाल्यामुळं भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34GDu5s
via IFTTT