नेहमी तत्पर रहा..... बेसावध आयुष्य जगू नका.
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!
आयुष्यात 'चुकीची व्यक्ती' आपल्याला 'योग्य धडा' शिकवते,
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.
जो दुसर्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.
तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.
ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने
जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय.....
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे.....
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका...
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....
जीवन हे यश आणि अपयश
यांचे मिश्रण आहे...
नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर..
आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर..
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
"आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका ...
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही."
“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात....
स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”
'तडजोड' म्हणजे सुखी आयुष्याचा 'पासवर्ड'
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात़

नेहमी तत्पर रहा..... बेसावध आयुष्य जगू नका.