नाशिक बातम्या: शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं महापालिकेकडून विविध उपययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्वधर्मीयांच्या लावण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसा निर्णय घेतला आहे. मृतांच्या अंत्यविधीला गेल्यानं करोनाची लागण होत असल्याचं व करोनाचा प्रसार होत असल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
त्यामुळं अंत्यविधीच्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणं अत्यावश्यक झालं आहे. त्यातूनच स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी कोण कोण गेले होते त्यांची ओळख पटावी हा यामागचा उद्देश आहे. संसर्ग झाल्यानंतरही तो लपवण्याकडे अनेकांचा कल असतो. सीसीटीव्हीमुळं जे माहिती लपवित आहेत, त्यांना तत्काळ क्वारंटाइन करता येणार आहे.

