असा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. यांनी केला आहे. देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यांनी काल २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. हे आर्थिक पॅकेज नेमकं कसं असेल? त्याचं वाटप कसं केलं जाईल? याची माहिती अर्थमंत्री देतील, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे.
'पंतप्रधान स्वत: वाईटपणा घेताना दिसत नाही. कुठलाही कटू निर्णय स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते इतरांवर सोडून देतात. कदाचित तो त्यांच्या प्रसिद्धी व्यवस्थापनाचा भाग असावा,' असा टोला आंबेडकरांनी हाणला आहे. 'मोदींच्या आर्थिक पॅकेजमध्ये केवळ मध्यमवर्गाचा विचार केलेला दिसतो.
असंघटीत क्षेत्रातील मजूर आणि स्थलांतरितांसाठी काहीही नाही. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मध्यमवर्गीयांना खूश करण्याकडे मोदी सरकारचा कल होता. आर्थिकदृष्ट्या अक्षम व कमकुवत लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं.
चौथ्या टप्प्यातही सरकारची हीच भूमिका कायम आहे,' अशी खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर मनसे व काँग्रेसच्या नेत्यांनीही जोरदार टीका केली आहे. '२० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज देणारे पीएम केअर फंडासाठी इतकी जाहिरात का करताहेत, असा बोचरा सवाल मनसेनं केला आहे.
