Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वकियांमुळेच पंकजा, रोहिणी पराभूत: खडसे

मुंबई: भाजपच्या नेत्या आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला आहे, असा खळबळजनक आरोप करतानाच पक्ष नेतृत्वाकडे याबाबतची तक्रार केली असून त्यावर कारवाई होईल, अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी व्यक्त केली आहे. नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला पक्षातील वरिष्ठ नेते जबाबदार आहेत. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला. याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. आता पक्ष नेतृत्व त्यावर काय भूमिका घेते. काय कारवाई करते ते बघू, असंही खडसे म्हणाले. ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. पक्षातील कोणत्याही अंतर्गत घडामोडींना पक्ष दोषी नसतो, तर पक्ष नेतृत्व दोषी असते, असा टोलाही त्यांनी लगावाला. नाराज आपोआप एकत्र येतात भाजपमधील नाराजांना एकत्र करण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर नाराजांना एकत्र आणण्याची गरज नसते. नाराज आपोआप एकत्र येत असतात, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक वाटतात का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस काय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय, या दोघांचंही इतक्या घाईने मुल्यमापन करणं योग्य होणार नाही. दोघांनाही वेळ दिला पाहिजे. त्यांना काम करण्यास वाव दिला पाहिजे, त्यांच्या नेतृत्वावर इतक्यात भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही, असं त्यांनी शेवटी सांगितलं.