मुंबई: येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण आणि पुण्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. झोपडपट्ट्यांमध्ये करोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असंही ते म्हणाले.
राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या ७ एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावा लागेल. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. ३ मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी १५ दिवस कुठल्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
तथापि, आम्ही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कारखाने आणि कृषीविषयक कामे सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली आहे. तसेच ही कामं करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन होतं की नाही, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही त्यांनी सांगितलं
जाणून घेऊया करोना संदर्भातील ताज्या घडामोडी..
