Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिकांचे नुकसान


अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.



अहमदनगर: जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जामखेड आणि कर्जत तालुक्यातील राशीन येथे जोरदार वाऱ्याह गारांचा पाऊस पडला. राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही पाऊस पडला. जिल्ह्यात ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपिटीचे सावट असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. त्यानंतर नगर जिल्ह्यात रविवारी जामखेड आणि कर्जत तालुक्यातील राशीन भागात जोरदार पाऊस पडला. जामखेड तालुक्यातील नान्नज, हळगाव, शिऊर, राजेवाडी, पाडळी, राजुरी सह अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट तसेच जोरदार पाऊस पडला. त्यामुळे या गावातील अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे पडली.
घरांच्या पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे तालुक्यातील पिकांना सुद्धा फटका बसला. कर्जत तालुक्यातील राशीन भागात सुद्धा गारांचा पाऊस पडला. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील राहाता, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात पाऊस पडला नाही. नगर शहरात सायंकाळी जोरदार पाऊस पडला. दरम्यान, या अवेळी होत असलेल्या पावसामुळे पिकांना मात्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. या पावसाचा फळबागांनाही फटका बसला आहे.